वृत्तपत्र जाहिराती. दि 20/10/18 च्या दैनिक महाराष्ट्र टाइम्स ने जाहिरातींचा कळस केला असे दिसते. पहिली तब्बल पाच पूर्ण पाने जाहिराती आहेत. पेपर वाचायला घेतला की नुसती पाने उलटत उलटत 6 व्या पानापासून बातम्या सुरू होतात. पेपर वाचायचा मूड खराब होतोच पण खेदाची बाब म्हणजे कागदाचा आणि परिणामी नैसर्गिक संपत्तीचा किती मोठ्या प्रमाणात गैरवापर. खरे तर पहिल्याच पूर्ण पानाची जाहिरात पटतच नाही. एवढ्या मोठ्या जाहिराती करायच्या असतील तर इलेक्ट्रॉनिक मीडिया वापराव्या. यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून नैसर्गिक संपत्तीचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पावले उचलली जावीत ही इच्छा आणि नम्र विनंती. नैसर्गिक संपत्तीचा असा ऱ्हास बघून दुःख होते. लोकांनी पेपर वाचताना किती तरी वेळ पाने उलटत राहणे कितपत योग्य वाटते. मटा सारख्या दर्जेदार वृत्त समूहाकडून याची त्वरित दखल घेतली जावी ही नम्र विनंती. Was this information helpful? |
Post your Comment