Report dated 18th february 2018 forwarded to zee news
आज दुपारी १.३० वाजतानची सातारा - बोरिवली सेमी लक्य़री बस सातारा डेपोतून पाउण तास उशीरा म्हणजे २.१५ ला सुटली. पुण्यामधे चांदणी चौकाजवळ बसचा टायर पंक्चर झाला. ड्रायव्हरक़डे पंंक्चर काढण्यासाठी स्टेपनी होती पण धक्कादक गोष्ट म्हणजे इतर आवश्यक उपकरणचे उपलब्ध नव्हती, ना आवश्यक स्कील होतं. केवळ प्रवाशांच्या प्रयत्नामुळे रस्त्यालगतच्या पंक्चरवाल्याकडुन विनवणी करून मागितलेल्या उपकरणांच्या सहय्याने व प्रवाशांनमधील काही माहीतगार व्यक्तींचा मदतीने तो टायर सुनारे दीड तासांनंतर बदलून बस मुंबईकडे निघाली. जेमतेम एक्सप्रेस हायवेला लागताच बस इंजीन बिघडल्यामुळे परत बंद पडली. तेव्हा साडे सहा वाजले होते. पाऊण तासाने लक्षात आले की हा बिघाड ड्रायव्हर कंडक्टरांच्याने काही दुरूस्त होऊ शकत नाही. प्रवासी आधीच कंटाळले होते ते जास्त वैतागले. डेपोतून बिघाड दुरूस्त करण्यासाठी माणसे यायला २ ते ३ तास लातील असे सांगून कंडक्टरने मागून येणार्या एस्ट्या थांबवायला सुरवात केली. साधारण १० मधे २ बस थांबत होत्या. असे करत करत सुमारे ८.३० पर्यंत सर्व प्रवाशांची बोरिवली सोडून ठाणे, दादर अशा ठिकाणच्या बसमधे सोय झाली. जी वेळ खरी बोरिवलीस पोहोचण्याची होती. ह्या प्रवाशांना पुढे बोरिवलीस पौहचेपर्यंत मध्यरात्र उजाडली असणार. अपवाद म्हणून काही प्रवाशांना एका बोरिवलीच्या बसमधे आरक्षण असून उभे राहून प्रवास करावा लागला. ह्या सामान, लहान मुले व वरिष्ठ नागरीकांसकट प्रवास करणार्या प्रवाशांच्या भयंकर त्रासदायक अनुभवातून एस्टी प्रशासनाने घेण्यासारखे बरेच धडे आहेत जे त्यानी घ्यावेच पण त्याबरोबरच आपल्या गलथान कारभाराने प्रवाशांना त्याच्या स्वकष्याच्या पैशात दिलेल्या त्रासाचे उत्तर द्यावे. Was this information helpful? |