Natraj Pencil — Work from Home - Pencil Packing Job

Hello sir/mam,
Kal mene natraj pencil packing job ke liye apply kiya tha... Jiska number mene facebook ke ek page se liya tha... Unho ne 520rs I card charge liya and adhar card and pan card ka photo manga... Jab mene photo and paise bharne ki reciept bheji to i card bna ke unhone photo mere whats up pe send kiya lekin jab saman ki delivery ki baat hui to aaj subah delivery ke liye GPS on krva ne ke liye dubara 1750 bharne ko bola mene vo bhi bhare fir delivary boy ne bola aapaka timeout ho gaya aap abhi vaapas 899 rupees bhejo. Unke boss ko call kiya to vo bole 599 fir baad me vapas bole 899 bhejo jb mene paise bharne se mna kiya to muje saman and work delivered nahi kiya gya... fir unse request ki ke aap muze mere paise vapis karo muze aapaka kaam nahi chahiye to vo bole aapke paise pending hai aap ko delivary boy vahape aake paise dega, Please sir help me... Aaj kal corona me bahot fraud ho rhe hai home base job ke liye... [protected] ye wo bhai ka number hai jisne muje work ka promise kiya and i card bnaya...[protected] ye uska gpay number hai jisme mene paise bhare...[protected] ye delevery boy ka nuber hai jisne mujse saman pohchane ka additional paise mange and na bharne pe saman nahi pohchaya gya.. Company ka name specifically btaya nahi gya baar baar puchane pr aur address bhi nahi bataya.. Natraj company hai and Andheri me hai but address nahi diya hai.
Was this information helpful?
No (10)
Yes (163)
Complaint comments 

Comments

[11/25, 10:30 AM] Kavita datar: #हेल्पलाईन_155260

दिनकर राव आज आनंदात होते. थोड्या वेळापूर्वी पेन्शन जमा झाल्याचा बँकेकडून एसेमेस आला होता. चांगल्या मार्क्स नी ग्रॅज्युएट झालेल्या त्यांच्या नातीला, सुमेधाला लॅपटॉप घेऊन देण्याचे त्यांनी कबूल केले होते. अचानक त्यांचा मोबाईल फोन वाजला. स्क्रीन वर अनोळखी नंबर झळकला. त्यांनी फोन घेतला.

"गुड इव्हिनिंग सर ! मी बीएसएनएल ऑफिस मधून बोलतेय.."
"बोला..."
"सर, आपलं केवायसी अपडेट पेंडिंग आहे. त्यासंदर्भात कॉल केलाय..."
"तुम्ही उद्या कॉल करा ना..आत्ता मी घाईत आहे..."
"सर, आज लास्ट डेट आहे...केवायसी अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्विस उद्यापासून बंद होईल.. फक्त दोन मिनिटांचं काम आहे..."
"ओके... मला काय करावं लागेल ?"

मोबाईल फोन बंद होण्याच्या भीतीने दिनकर रावांनी केवायसी अपडेट करायचं ठरवलं.
"तुम्हाला एक एसएमएस येईल... त्यातील लिंक वर क्लिक करून एक फॉर्म दिसेल तो भरायचा आहे. मी फोन चालू ठेवते, तुम्ही बघा एसएमएस आलाय का ?"
तिचं बोलणं सुरु असतानाच त्यांनी मेसेजेस चेक केले. BZ-BXNLKC या नावाने एसएमएस आलेला दिसत होता.
"हो...आलाय एसेमेस..."
त्यांनी फोनवर बोलणाऱ्या मुलीला सांगितलं.
"ओके...त्यात एक लिंक असेल, ती ओपन करा."

त्यांनी एसएमएस मधली लिंक क्लिक केली. एक फॉर्म ओपन झाला. त्यात त्यांचे पूर्ण नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर टाकायचा होता. फॉर्म भरल्यावर खाली एक बटन ऍक्टिव्हेट झालं. त्यावर Submit & Pay असं लिहिलेलं दिसत होतं.
"ते खाली बटन दिसते...त्यावर Submit & Pay लिहिलंय... ते कशासाठी आहे ?"
"सर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला फक्त दहा रुपये लेट चार्जेस भरावे लागतील. त्यासाठी ते बटन क्लिक करा."

फक्त दहा रुपये भरावे लागतील, म्हणून फारसा विचार न करता दिनकर रावांनी ते बटन क्लिक केले. बटन क्लिक केल्यावर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय असे पर्याय समोर आले. त्यांनी नेट बँकिंग चा पर्याय निवडला.

कस्टमर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यांनी दहा रुपये भरले. त्याबरोबर त्यांना एसएमएस आल्याचे नोटिफिकेशन मिळाले.
"थँक्यू सर ! आता आपले केवायसी अपडेट झालेय. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद."
एवढे बोलून तिने फोन कट केला.

मघा आलेला मेसेज कसला आहे? ते बघण्यासाठी म्हणून दिनकर रावांनी सहज मेसेज उघडला. मेसेज वाचून त्यांचे हात पाय थरथरू लागले... त्यांच्या बँक अकाउंट मधून दोन लाख डेबिट झाल्याचा तो मेसेज होता. बँकेतील आधी जमा असलेले दीड लाख आणि आत्ताचे पेन्शनचे पन्नास हजार असे एकूण दोन लाख कोणीतरी काढून घेतले होते.
थरथरत्या आवाजात त्यांनी सुमेधाला हाक मारली. सुमेधा धावतच त्यांच्या खोलीत आली.
"काय झालं आजोबा ? बरं वाटत नाही का?"
त्यांनी दिला झालेला प्रकार सांगितला.

अलीकडेच भारत सरकारच्या गृह खात्याने कुठलातरी हेल्पलाइन नंबर आर्थिक सायबर गुन्हा झाल्यानंतर वापरण्यासाठी लॉन्च केल्याची माहिती तिने कुठेतरी वाचली होती. पण नेमका तो नंबर तिला आठवत नव्हता. तिने ताबडतोब इंटरनेटवरून तो नंबर शोधून काढला 155260.

दिनकररावांना त्यांच्या बँकेचे पासबुक मागून घेऊन, तिने तो नंबर डायल केला. तीन-चारदा डायल केल्यावर तो नंबर एकदाचा लागला. पलीकडून बोलणाऱ्या ने सुमेधाला दिनकर रावांचे पूर्ण नाव, त्यांच्या बँक अकाऊंट चे डिटेल्स आणि किती वाजता, किती पैसे काढले गेल्याचा एसेमेस आला ते विचारलं. सुमेधाने त्यांना पाहिजे ती माहिती दिली.

थोड्या वेळाने दिनकर रावांच्या फोनवर या हेल्पलाइन कडून एक मेसेज आला. त्यात एक युनिक नंबर दिला होता. हा नंबर वापरून सायबर क्राईम पोर्टलवर वर तक्रार नोंदवावी असे निर्देश त्या मेसेज मध्ये दिले होते.
त्याप्रमाणे सुमेधाने त्यांच्याच मोबाईल वरून https://cybercrime.gov.in हे पोर्टल ओपन करून सगळी माहिती भरून, हेल्पलाइन कडून आलेला युनिक तिकीट नंबर टाकून तक्रार नोंदवली.

सायबर चोराने काढून घेतलेले दिनकर रावांचे सर्व पैसे तीन दिवसांतच पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा झाले.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 2020 मध्ये 155260 ही हेल्पलाईन आर्थिक सायबर गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सुरु केली आहे. https://cybercrime.gov.in या पोर्टलशी ही हेल्पलाईन संलग्न आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत ही हेल्पलाइन 24 * 7 कार्यरत आहे. बाकीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दहा ते सहा या वेळेत की हेल्पलाईन चालू असते. या हेल्पलाईन द्वारे बहुतेक बँका, काही मोठी व्यापारी प्रतिष्ठाने आणि वॉलेट जोडले गेले आहेत.

हेल्पलाईन चे काम काम कसे चालते?

आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला फक्त हेल्पलाईन 155260 डायल करावी लागेल. त्यानंतर, एक पोलिस ऑपरेटर फसवणूकी च्या व्यवहाराचे तपशील आणि फसवल्या गेलेल्या व्यक्तीची मूलभूत वैयक्तिक माहिती नोंदवेल.

त्यानंतर हे तपशील सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड्स रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टमवर तिकिटच्या स्वरूपात सबमिट करतील.

पीडित व्यक्तीच्या बँकेकडून माहिती घेऊन, फसवणूक केलेले पैसे ज्या बँक/वॉलेटमध्ये गेले आहेत, त्यावर अवलंबून हे तिकीट संबंधित बँका, वॉलेट, व्यापारी इत्यादींना पाठवले जाईल.

क्रमांकासह तक्रारीची पोचपावती पीडित व्यक्तीला एसएमएसच्या स्वरूपात पाठवली जाईल. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in/) 24 तासांच्या आत, पावती क्रमांक वापरून फसवणुकीचे संपूर्ण तपशील सबमिट करण्याचे निर्देश देखील यात असतील.

संबंधित बँकेला रिपोर्टिंग पोर्टलच्या डॅशबोर्डवर तिकीट दिसेल. त्या अनुषंगाने ती बँक सिस्टममध्ये व्यवहाराचे तपशील तपासू शकेल.

फसवणूक केलेले पैसे अद्याप उपलब्ध असल्यास, बँक ते होल्डवर ठेवते, म्हणजे फसवणूक करणारा हे पैसे काढू शकत नाही. तथापि, फसवणूक केलेले पैसे दुसर्‍या बँकेत गेले असल्यास, तेच तिकीट पुढील बँकेकडे पाठवले जाते ज्यामध्ये पैसे गेले आहेत.

फसवणूक करणार्‍यांच्या हाती पैसे जाण्यापासून वाचवण्यापर्यंत प्रक्रिया पुन्हा केली जाते.

सध्याच्या डिजीटल युगात, सायबर चोरांना बळी पडणाऱ्या पीडित व्यक्तींसाठी ही हेल्पलाईन म्हणजे एक मोठे वरदान आहे. शक्यतो या हेल्पलाईनचा वापर गुन्हा घडल्या बरोबर लगेच केल्यास नुकसानी टाळता येऊ शकेल. आर्थिक सायबर गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्ती बँक अकाउंट बंद करण्यात, पोलिस स्टेशनच्या चकरा मारण्यात बहुमूल्य वेळ गमावतात. तोवर सायबर चोर त्यांचे पैसे घेऊन गायब झालेले असतात.

काही कारणाने या हेल्पलाइन चा वापर करता आला नाही तरीही, आर्थिक गुन्हा घडल्यानंतर ज्या बँकेतून पैसे गेले आहेत, त्या बँकेच्या तीन कामाच्या दिवसांमध्ये सायबर पोलिसांकडे केलेल्या एफ आय आर ची सही शिक्क्या सह असलेली कॉपी जरूर सबमिट करावी आणि पोच घ्यावी. असे केल्यास बँकेला 90 दिवसांच्या आत चोरी गेलेले पैसे परत द्यावे लागतात. तसे रिझर्व बँकेचे सर्व बँकांना आदेश आहेत. बँकेने पैसे परत न केल्यास फसवणूक झालेली व्यक्ती ग्राहक न्यायालयात देखील दाद मागू शकते.

सुरक्षित आणि सजग राहून टेक्नॉलॉजी चा वापर करा.

©कविता दातार
सायबर सुरक्षा सल्लागार
[11/25, 10:30 AM] Kavita datar: जरूर वाचा आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना फॉरवर्ड करा🙏🏻
how to contact and how to start this job...

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint