Address: | Humanware technology pvt.ltd sec 11, mayuresh chamber |
आदरणीय सर/ मॅडम..
एप्रिल पासून मी रोज घणसोली ते बेलापूर स्टेशन प्रवास करतोय.. यादरम्यान खूप वेळा काही गोष्टी निदर्शनास आल्या. टाइम वर येत नाही, काही बसेसचा मध्येच सेन्सर खराब होऊन बंद होतात..
सध्याची परिस्थिती पाहता सामान्य माणसाला लोकल सेवा बंद आहे म्हणून बस ला खूप गर्दी होते. बसेस २, २ तास लेट होतात. माझी विनंती आहे की तुम्ही सकाळी आणि संध्यकाळी बस चे रूट वाढवा जेणेकरून जी माणसं लांब जाणारी असतात ती वेळेवर घरी पोचतील. दरम्यान बेलापूर स्टेशन ला कल्याण, घणसोली, डोंबिवली या गाड्या २, २ तास लेट होत आहेत. त्यामुळे लोकांना खूप वेळ उभा राहून वाट बघावी लागते, आणि गाड्या लेट झाल्यामुळे लोकांची बस ला खूप गर्दी होते.
माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया करून गाड्या वाढवा जेणेकरून प्रवाशी आणि कंडक्टर मध्ये बस मध्ये होणाऱ्या गर्दीमुळे वाद होणार नाहीत, बस साठी wait करणारे प्रवाशी आणि बस स्टेशन मास्तर मध्ये होणारे वाद थांबतील, आणि मुळात प्रवाशी सुखरूप टाइम वर घरी पोचतील.
मी आशा करतो की तुम्ही स्वतः दाखल घ्याल याची.
आपलाच,
प्रवाशी Was this information helpful? |
Post your Comment