मी रोज पिंपळे गुरव ते कर्वेनगर ला जॉबसाठी ये जा करतो. मला सध्या इतका त्रास होतोय कि वाटतंय मी जॉब सोडून द्यावा. साधारण एक ते दीड वर्षांपासून युनिव्हर्सिटी सरकली ला इतकी भयानक ट्रॅफिक जॅम होते कि कल्पना नाही करू शकत. पण आजपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. तीन ते चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम होते . याचे कारण असे आहे कि दररोज ९. ३० ते ११. ३० या वेळेत ट्राफिस पोलीस सिग्नल बंद करून चौकात उभे राहतात. आणि १० ते १५ मिनिटे एका बाजूची ट्रॅफिक अडवून ठेवतात . यामुळे ३ ते ४ किलोमीटर पर्यन्त लांबच लांब रांगा लागतात . त्यांना हेपण काळात नाहीकी औंध रोड कडून सगळ्यात जास्त ट्रॅफिक युनिव्हर्सिटी कडे येते. मुळात यांना सिग्नल बंद करायचे अधिकार आहेत का, आणि असेल तर ते असे रोज करता येतात का ?. यामुळे तयहोते काय कि क्रॅम्ह्णाला पण त्रास होतो आणि त्यांना काम नसटताना ४ ते ५ ज्यांना उभे राहावे लागते . ज्याची काहीच गरज नसते . जर सिग्नल चालू असेल तर आमचा त्रास तर कमी होईल आणि त्यांचे जे ४ - ५ शिपाई उभे असतात त्यांना पण दुसरे ट्रॅफिक कडे लक्ष देता येईल. आणि हे कायम चालू आहे. तरी याची पुणे ट्रॅफिक पोलीस प्रमुख यांनी नोंद घेऊन योग्य कारवाई करावी. Was this information helpful? |
Post your Comment